तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येकपटीने अधिक
देव तुम्हाला देईल.
नेहमी उच्च ध्येय ठेवा,
व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.
जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,
विजय हा नेहमी सत्याचाच होतो.
दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
काही गोष्टी मिळवायला
वेळ लागतोच.
संयम बाळगा…
आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
जो काळानुसार बदलतो,
तोच नेहमी प्रगती करतो.
काळानुसार बदला,
नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.
जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही
ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.
वाया घालवलेला वेळ
आपलं भविष्य बिघडवत असतं.
नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.
वागण्यात खोटेपणा नसला की,
जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.
कुणालाच कमी समजू नका,
ज्याला तुम्ही काच समजत असाल,
तो हिरासुद्धा असू शकतो.
कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.
प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर
म्हणजे शांत राहणे.
केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही
तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.
खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.
अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
कोणतंही चांगल कार्य करणे सुरुवातीला अवघडच असते.
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.