दिनविशेष 21 नोव्हेंबर

जागतिक दूरदर्शन दिन

  • 1877: थॉमस एडिसनने फोनोग्राफच्या शोधाची घोषणा केली.
  • 1905: अल्बर्ट आइन्स्टाईनचा वस्तुमान-ऊर्जा समतुल्य सूत्र, E = mc², ॲनालेन डेर फिजिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला.
  • 1911: लंडनमधील महिलांनी संसदेच्या निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी आणि मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
  • 1942: राजा नेने दिग्दर्शित प्रभात हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
  • 1955: संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुकारला.
  • 1962: यशवंतराव चव्हाण यांची भारताचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • 1962: भारत-चीन युद्ध – 19 नोव्हेंबर रोजी भारतीय भूभागावर आक्रमण करणाऱ्या चीनने घोषित केलेला एकतर्फी युद्धविराम लागू झाला.
  • 1971: बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान गरीबपूरच्या लढाईत भारतीय हवाई दलाची पाकिस्तानी सैन्याशी पहिली चकमक. पाकिस्तानचा सर्वसमावेशक पराभव झाला.
  • 1962 दक्षिण कोरियाने नवीन संविधान स्वीकारले.
  • 2002: NATO ने बल्गेरिया, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि स्लोव्हेनियाला सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले.
  • 2004: युक्रेनियन अध्यक्षीय निवडणुकीची दुसरी फेरी आयोजित केली गेली, ज्यामुळे निवडणुकीच्या अखंडतेबद्दल व्यापक निषेध आणि वाद निर्माण झाला.
  • 2017: रॉबर्ट मुगाबे यांनी झिम्बाब्वेच्या सदतीस वर्षांच्या कार्यकाळानंतर औपचारिकपणे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • 1694: ‘व्हॉल्तेर’ – फ्रेंच तत्त्वज्ञानी यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1778)
  • 1899: ‘हरेकृष्णा महाबत’ – ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1987)
  • 1910: ‘छ्यान चोंग्शू’ – चीनी भाषेतील लेखक यांचा जन्म.
  • 1926: ‘प्रेम नाथ’ – हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 3 नोव्हेंबर 1992)
  • 1927: ‘शं. ना. नवरे’ – नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 25 सप्टेंबर 2013)
  • 1941: ‘आनंदीबेन पटेल’ – भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांचा जन्म.
  • 1987: ‘ईशा करवडे’ – भारतीय बुद्धीबळपटू यांचा जन्म
  • 1908: ‘सत्येंद्रनाथ बोस’ – देशभक्त यांना अलीपूर कारागृहात फाशी.
  • 1963: ‘चिंतामण विनायक जोशी’ – प्रसिद्ध विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म: 19 जानेवारी 1892)
  • 1970: ‘सर चंद्रशेखर व्यंकटरमण’ – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म:7 नोव्हेंबर 1888)
  • 1996: ‘डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम’ – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी यांचे निधन. (जन्म: 29 जानेवारी 1926)
  • 1997: ‘आचार्य बाळाराव सावरकर’ – यांचे निधन.
  • 2015: ‘अमीन फहीम’ – भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1939)
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group