
एका घनदाट जंगलात एक बलाढ्य सिंह राहात होता. तो रोज कोणत्यातरी प्राण्याला शिकार करून खात असे. जंगलातील सगळे प्राणी त्याला घाबरत होते आणि त्याच्या तावडीत सापडण्याच्या भीतीने वावरत होते.
एका दिवस ठरले की रोज एका प्राण्याने स्वतःहून सिंहाजवळ जाऊन त्याचे भोजन व्हावे, म्हणजे इतर प्राण्यांना सतत भीती बाळगावी लागणार नाही. सगळ्यांनी ही योजना मान्य केली.
एके दिवशी एका लहानशा सशाचा नंबर लागला. ससा छोटा होता, पण त्याचा बुद्धीचा वापर करून त्याने सिंहाला धडा शिकवायचे ठरवले. तो मुद्दाम उशिरा सिंहाच्या गुहेकडे निघाला. सिंह रागावला आणि गर्जना करत म्हणाला, “कुठे होतास एवढा वेळ? मला उपाशी ठेवलेस!”
ससा शांतपणे म्हणाला, “महाराज, मी वेळेवर निघालो होतो, पण वाटेत मला दुसरा सिंह भेटला. तो म्हणाला की तोच या जंगलाचा राजा आहे. त्याने मला अडवले आणि तुम्हाला भेटण्यापासून रोखले!”
हे ऐकून सिंहाला प्रचंड राग आला. तो गरजत म्हणाला, “माझ्या जंगलात दुसरा कोण राजा असू शकतो? मला लगेच त्याच्याकडे ने!”
ससा त्याला एका खोल विहिरीजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, “महाराज, तो सिंह इथेच राहतो!” सिंहाने विहिरीत पाहिले आणि त्याला स्वतःचाच प्रतिबिंब दिसले. त्याला वाटले की खरोखरच एक दुसरा सिंह आहे. संतापाच्या भरात त्याने त्या सिंहावर झेप घेतली आणि थेट विहिरीत कोसळला!
सगळे प्राणी आनंदले आणि सशाचे कौतुक केले. त्या दिवसापासून जंगलातील प्राणी निर्धास्तपणे जगू लागले.
तात्पर्य :
बळावर मोठेपण सिद्ध होत नाही, तर अक्कल आणि धैर्यानेही मोठी कामे करता येतात.