एका जंगलात खूप उंच आणि पसरलेलं झाड होतं. त्या झाडाखाली एक लाकूडतोड्या येत असे आणि झाडाच्या सावलीत बसून आराम करत असे.
एक दिवस तो कुऱ्हाड घेऊन आला आणि झाडाच्या एका फांदीला तोडायला लागला. झाडाला खूप वेदना झाल्या, पण तरीही काहीच न बोलता तो लाकूडतोड्या जेव्हा थकत असे, तेव्हा झाड त्याला सावली द्यायचं.
तेव्हा शेजारच्या झुडपाने विचारलं,
“अरे, तू त्याला सावली देतोस आणि तो तुलाच कापतोय – तरीही शांत का आहेस?”
झाड उत्तर देतं,
“कारण ही कुऱ्हाडही माझ्याच एका तुकड्यापासून बनलेली आहे.”
तात्पर्य:
आपल्याच लोकांकडून झालेलं नुकसान अधिक वेदनादायक असतं – म्हणून नात्यांची जपणूक करा.