
एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचे चार मुलगे सतत एकमेकांशी भांडत असत. वडिलांना याचे खूप दुःख होत असे. एक दिवस त्यांनी सर्व मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण मुलांनी ऐकले नाही.
शेवटी वडिलांनी एक युक्ती केली. त्यांनी प्रत्येक मुलाला एक काठी आणायला सांगितली आणि त्यांचा एक गठ्ठा बांधला. नंतर त्यांनी मुलांना तो गठ्ठा तोडायला सांगितले. मुलांनी खूप प्रयत्न केला, पण कोणालाही ते जमले नाही.
त्यानंतर वडिलांनी गठ्ठा सोडून प्रत्येकाला एकेक काठी दिली आणि ती तोडायला सांगितली. मुलांनी सहजपणे आपल्याला मिळालेली काठी तोडली.
वडिल म्हणाले, “तुम्हीही जर एकत्र राहिलात, तर कोणीही तुम्हाला तोडू शकणार नाही. पण जर तुम्ही वेगवेगळे राहिलात, तर प्रत्येकजण तुम्हाला तोडेल.”
तात्पर्य :
एकतेत ताकद असते. विभाजनाने दुर्बलता येते, तर एकजुटीने संकटांवर मात करता येते.