
एका गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो प्रामाणिक आणि मेहनती होता, पण त्याच्या शेतात फारसा फायदा होत नव्हता. एके दिवशी शेतात काम करताना त्याला नदीकिनारी सोन्याचा सुंदर तुकडा सापडला. तो खूप आनंदी झाला, पण त्याच्या मनात विचार आला, “मी हा तुकडा विकून श्रीमंत होऊ शकतो, पण हा कोणाचा हरवलेला असला तर?”
रामूने तुकडा गावातील सरपंचाकडे नेला आणि त्यांना सत्य सांगितले. सरपंचाने गावात घोषणा केली की सोन्याचा तुकडा हरवलेला कोण आहे का? तीन दिवस वाट पाहूनही कोणीच पुढे आले नाही. सरपंचाने रामूची प्रामाणिकता पाहून तो तुकडा त्यालाच परत दिला आणि म्हणाले, “तुझ्यासारख्या माणसामुळेच समाजाला प्रामाणिकतेचा आधार मिळतो.”
रामूने तो तुकडा विकला, त्यातून आपल्या शेतासाठी नवीन साधनं खरेदी केली आणि त्याचे जीवन सुधारले. त्याच्या प्रामाणिकतेची चर्चा संपूर्ण गावात झाली, आणि त्याचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायक ठरला.
तात्पर्य :
सत्य आणि प्रामाणिकता नेहमीच विजय मिळवून देतात. परिस्थती कितीही कठीण असली तरी सत्याचा मार्ग सोडू नये.