बोधकथा क्र. 31
बोधकथेचे नाव : पाण्याचा घडा

एका गावात एक आजीबाई राहत होती. ती रोज नदीवरून पाणी आणण्यासाठी दोन माठ वापरत असे. एक माठ चांगला होता, तर दुसरा माठ तळाशी एक छोटे छिद्र पडले होते. नदीपासून घरी येईपर्यंत फुटलेल्या माठाच्या त्या छिद्रातून अर्धे पाणी गळून पडायचे.

फुटलेल्या माठाला या गोष्टीची खूप खंत होती. एके दिवशी त्याने म्हातारीला म्हटलं, “माझ्या फुटक्यापणामुळे तुझं अर्धं पाणी रस्त्यातच गळून जातं. माझ्यामुळे तुझं काम अर्धवट होतं.”

म्हातारी हसली आणि म्हणाली, “तू लक्ष दिलंय का की ज्या बाजूने तुझ्या छिद्रामुळे पाणी गळतं तिथे रस्त्याच्या त्या बाजूला सुंदर फुलं फुलली आहेत? मी तुझ्या फुटकेपणाचा उपयोग केला. रस्त्याने येताना रस्त्याच्या ज्या बाजूला तुझ्या छिद्रातून पाणी गळतं त्या जागेवर मी फुलांच्या बिया पेरल्या, आणि आता त्यांचं रोज पाण्यामुळे फुलणं सुरू झालंय. त्यामुळेच मला रोज सुंदर फुलं मिळतायत.”

फुटलेल्या माठाला कळलं की त्याच्या कमतरतेमुळेच त्या फुलांना जीवन मिळालं आहे.

तात्पर्य :
आपल्यात असलेल्या कमतरता आपल्या जीवनात सुंदर बदल घडवू शकतात. प्रत्येकाचा काही ना काही उपयोग आहे, फक्त आपल्याला त्या कमतरतेचा योग्य वापर करायला यायला हवं.

Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group