बोधकथा क्र. 50
बोधकथेचे नाव : शक्ती आणि शांतीचा संगम

एका घनदाट जंगलात एक वाघ राहायचा. त्या जंगलातून एक नदी व्हायची, त्यात एक मासाही राहायचा. वाघ जंगलाचा राजा होता. त्याचे शौर्य आणि ताकद पाहून सर्व प्राणी त्याला आदर देत होते. वाघ विचार करायचा की माझ्या बल आणि शक्तीमुळेच सर्वजण मला मानतात. मला मित्रांची आवश्यकता नाही. तो नेहमी एकटा राहायचा आणि दुसऱ्याशी जास्त बोलायचा नाही. त्याच्या याच स्वभावामुळे त्याला एकही मित्र नव्हता.
दुसरीकडे मासा खूप शांत आणि प्रेमळ होता. तो जंगलातील इतर प्राण्यांशी हसतमुख आणि मित्रत्वाने राहायचा. तोबप्रत्येकाला गरजेवेळी मदत करायचा. त्याच्यामुळे जंगलातील बहुतांश प्राणी त्याचे मित्र बनले होते.
एक दिवस वाघ नदीच्या काठावर आला, त्याने माशाला पाहिलं आणि जरा गर्वानेच म्हणाला, “तू इतका छोटा आहेस, तरी तुला खूप सारे मित्र कसे आहेत?” मासा शांतपणे हसला आणि म्हणाला, ” वाघजी, तुमच्याकडे शक्ती आणि ताकद आहे, पण मित्र जोडण्यासाठी या दोन्हीपेक्षा प्रेमळ व शांत स्वभाव महत्वाचा आहे. शांतपणा, प्रेम आणि एकता हेच खरं सामर्थ्य आहे.”
वाघ नरमला आणि खाली मान घालून म्हणाला, “तू म्हणतोस ते खरे आहे. मला मित्र हवे आहेत, पण मला कळतच नाही की मित्र कसे जोडायचे.” मासा उत्तरला, “मित्र जोडण्यासाठी ताकद नाही तर प्रेमळता आणि समजून घेणं महत्त्वाचं आहे.”
वाघाने ठरवलं की त्याला इतरांना मदत करायला आणि प्रेमाने वागायला शिकावं लागेल. त्याने जंगलातील प्राण्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले, आणि लवकरच त्याच्याकडे खूप मित्र होऊ लागले. त्याला समजलं की जीवनात ताकद आणि शौर्य आवश्यक असले तरी, सच्चे मित्र मिळवण्यासाठी प्रेम, शांतता आणि समजून घेणं आवश्यक आहे.
तात्पर्य :
ताकद आणि शौर्य महत्त्वाचे असले तरी, मित्र मिळवण्यासाठी प्रेम आणि शांत स्वभाव आवश्यक आहेत. मैत्रीची खरी शक्ती प्रेम, सहकार्य आणि समजून घेणं यामध्ये आहे.