
एकदा एक कोल्हा आणि एक मांजर जंगलात भेटले. कोल्हा आपल्या हुशारीबद्दल नेहमी मोठमोठ्या गोष्टी सांगत असे. तो म्हणाला, “माझ्याकडे शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या आहेत.”
मांजर म्हणाली, “माझ्याकडे फक्त एकच युक्ती आहे, पण ती खात्रीची आहे.”
ते बोलत असतानाच एक शिकारी आपल्या कुत्र्यांसह तिकडे आला. मांजर लगेच झाडावर चढली आणि सुरक्षित राहिली.
पण कोल्हा मात्र काय करावे हे ठरवू शकत नव्हता. तो एका युक्तीचा विचार करतो, तोपर्यंत कुत्र्यांनी त्याला पकडले.
तात्पर्य :
अनेक योजना असण्यापेक्षा एक खात्रीची योजना असणे चांगले!